१४० वर्षानंतर राजेवाडीबाबत आटपाडी तालुक्याला मिळणार न्याय ! - सादिकभाईंच्या संघर्षाला यश !; विजय लक्ष्मण पुजारी .
राजेवाडी तलाव...ता आटपाडी
आमदार सुहास बाबर व इतर मान्यवरांचे खास अभिनंदन !
सादिक भाई खाटीक.. आटपाडी
आटपाडी kd24newz: आटपाडी तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा निर्णय अखेर ११ जून २०२५ रोजी झाला . तब्बल १४० वर्षांची प्रतीक्षा संपवून राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा ऐतिहासिक निर्णय सांगलीच्या आढावा बैठकीत जाहीर केला. आमदार सुहासभैय्या बाबर यांनी उपस्थित केलेल्या मागणीवर मंत्री ना . विखे - पाटील यांनी ही घोषणा केली . या निर्णयामुळे संपूर्ण आटपाडी तालुक्याला राजेवाडीचे पाणी मिळण्याच्या आणि इतर प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या ऐतिहासिक निर्णयामागे विशेष करून आमदार सुहासभैय्या बाबर यांचेसह ३० मान्यवर महोदयांचे सामूहिक प्रयत्न असले तरी, राजेवाडी तलावाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने वेडापीर झालेले आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांचे जिगरबाज प्रयत्न सत्यात उतरत असल्याचे दिसू लागले आहेत .
७ नोव्हेंबर २०२४ रोजी रोजी सादिक खाटीक यांनी त्यांच्या फेसबुक अकोंटसह , प्रिंट मिडीया, वॉटसअपवरून केलेल्या पोस्टने या प्रश्नाला जोरदार गती मिळाली, वाचा फुटली . त्यानंतर त्यांनी सातत्याने यावर राज्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व मान्यवरांचे लक्ष वेधणारे प्रयत्न सुरू केले . त्यांच्या विनंतीवरून विद्यमान ६ खासदार , विद्यमान १४ आमदार, ६ माजी आमदार व अन्य ४ मान्यवर महोदयांनी खास पत्रे लिहीत मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधले . तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या प्रचारसभेत सादिक खाटीक यांनी, या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडत जनतेच्या मनात नवा उत्साह जागवला होता .
या संघर्षाचे प्रतिबिंब १४ जानेवारी २०२५ रोजी राजेवाडी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत आणि २६ जानेवारीच्या ग्रामसभेत उमटले. ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सादिकभाईंच्या कार्याचा गौरव ठराव संमत करून केला. यानंतर सादिक खाटीक यांनी सतत सोशल मीडियावर आणि प्रिंट मीडियात राजेवाडीच्या प्रश्नाला धार दिली.
प्रश्नाचे लक्षवेधी गांभीर्य लक्षात घेऊन तितक्याच गांभीयाने, तडफेने, युवा आमदार सुहासभैय्या बाबर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि या निर्णयासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व ३० मान्यवरांचे आटपाडी तालुक्याच्या जनतेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. परंतु हा ऐतिहासिक प्रश्न सुटावा म्हणून स्वतः एका पक्षाचे पदाधिकारी असतानाही , आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विरोधी, व सत्तेतल्या सर्व पक्षाच्या नेतेमंडळीची मनधरणी करणाऱ्या सादिक खाटीक यांचेही जिगरबाज प्रयत्न हजारोंच्या प्रशंसेस पात्र ठरत आहेत .
राजेवाडी तलावाच्या आटपाडी तालुक्यातील प्रश्नांचे निराकरण होईपर्यंत सादिकभाईंच्या संघर्षाला सलाम करत, "लगे रहो सादिकभाई, डटे रहो सादिकभाई!" अशी अंतरीची साद खरसुंडीच्या श्रीनाथ भक्ताने अर्थात खरसुंडीचे २५ वर्षे सरपंचपद भुषविलेल्या दिवंगत सरपंच सीतारामबापू पुजारी - गुरव यांच्या सख्या पुतण्याने अर्थात विजयराव लक्ष्मण पुजारी सर यांनी सोशल मिडीयातून घातली आहे .