Sanvad News खानापूर -आटपाडी मतदार संघातील जलप्रश्नांवर निर्णायक पाऊल!आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश

खानापूर -आटपाडी मतदार संघातील जलप्रश्नांवर निर्णायक पाऊल!आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश

Admin

 खानापूर -आटपाडी मतदार संघातील जलप्रश्नांवर निर्णायक पाऊल!आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश


खानापूर-आटपाडीच्या पाणीप्रश्नांना दिलासा!टेंभू योजनेस १५०० कोटींचा निधी – विखे पाटलांची मंत्रिमंडळ बैठकीत ग्वाही


राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगलीकडे, पीडीएनला गती, पंपगृहात सुधारणा – जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ऐतिहासिक निर्णय


आटपाडी KD24NEWZ: सांगली,दि. ११ जून खानापूर-आटपाडी तालुक्याच्या पाणी प्रश्नांना न्याय देणारा ऐतिहासिक दिवस आज सांगलीत पाहायला मिळाला. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत टेंभू योजनेस १५०० कोटींचा निधी देण्याची स्पष्ट ग्वाही देण्यात आली. या निर्णयामागे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार सुहास बाबर यांच्या सातत्यपूर्ण आणि धडाडीच्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे.

      या बैठकीत आमदार बाबर यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्नांचा धांडोळा मंत्र्यांसमोर मांडताना, शेतकऱ्यांच्या वेदना, रखडलेल्या योजनेचे दुष्परिणाम आणि जनतेची आशा-आकांक्षा यांचा ठाम आवाज दिला. त्यांचे ठोस सादरीकरण आणि तांत्रिक मुद्द्यांची जाण पाहता मंत्री विखे पाटील यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यासाठी दोन वर्षांत १५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

    टेंभू योजनेतील पंप यंत्रणा दोन दशके जुनी झाल्यामुळे वारंवार बिघाड होते. हे लक्षात घेत जुने पंप टप्प्याटप्प्याने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पंपगृह क्र. १ ते ५ येथे विजेची अडचण भासू नये यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. हे सगळे निर्णय म्हणजे आटपाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणारे पाऊल ठरणार आहेत.

     या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक अडचणी, जलव्यवस्थापन आणि शाश्वत नियंत्रण याला गती मिळणार आहे. ही मागणी आमदार बाबर यांनी अनेकदा शासन दरबारी मांडलेली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

     पुढे पाहिले असता, साठवण तलावाच्या काठावरील वंचित क्षेत्रासाठी पारंपरिक कालव्याऐवजी पीडीएन (Pipe Distribution Network) तंत्रज्ञान राबवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी आणि कार्यक्षम पाणीपुरवठ्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.

      या सर्व कामांची अंमलबजावणी गांभीर्याने होण्यासाठी मंत्रालयात लवकरच विशेष बैठक घेण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक प्रस्तावही त्वरित सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

      या निर्णयाबद्दल आमदार सुहास बाबर यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, "हा सन्मान माझा नसून माझ्या मतदारसंघातील जनतेचा आहे. मी फक्त त्यांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचे काम केले. ही सुरुवात आहे, अजून अनेक निर्णयांसाठी लढा सुरूच राहील."

To Top