लोककलेसाठी पुढाकार : तमाशा आणि कलाकेंद्र तक्रार निवारणासाठी दोन समित्यांची स्थापना
आटपाडी kd24newz मुंबई, दि. 16 : राज्यातील पारंपरिक लोककलेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा निर्णय घेत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे.
या समित्या संबंधित क्षेत्रातील फड मालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे दोन्ही समित्यांचे अध्यक्ष असणार आहेत.
तमाशा तक्रार निवारण समिती :
या समितीत रघुवीर खेडकर, गोपाळ नाना शेषेराव, संभाजी जाधव, मंगलाताई बनसोडे, अतांबर तात्या शिरढोणकर, गणेश चंदनशिवे, खंडुराज गायकवाड आणि सहसंचालक यांचा समावेश आहे.
कलाकेंद्र तक्रार निवारण समिती :
ही समिती बाळासाहेब काळे, अभिजित काळे, रेश्मा परितेकर, सुरेखा पुणेकर, प्रमिला लोदगेकर, धोंडीराम जावळे, प्रकाश खांडगे आणि सहसंचालक यांच्या सहभागाने काम करणार आहे.
या समित्यांचा कार्यकाळ 30 दिवसांचा असणार असून, आवश्यकतेनुसार इतर संबंधित व्यक्तींनाही चर्चेसाठी बोलवले जाणार आहे. पारंपरिक लोककलेला नवे बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.